नेहमी प्रमाणे काम उरकून घरी जायचे वेध लागले असता सांताक्रूझ प. येथुन सांताक्रूझ पू. येथे घरी जाण्यास निघालो. रोजच्या प्रमाणे कानात कॉड व गाणी ऐकत चालत होतो. थोडा पुढे आलो आणि माझा राष्ट्रध्वज एका दुकानाच्या बाहेर कच-यात पडला होता.
पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनच तर दिवस झाले होते स्वातंत्र्य दिन साजरा करुन आणि लगेचच ध्वजाचा हा अपमान म्हणजे त्या दिवशी म्हटलेल राष्ट्रगान, केलेली प्रतिज्ञा सगळं सगळं व्यर्थ?
मी प्रथम त्या ध्वजाला उचलून साफ केल. परंतु बाजूलाच चहा पीत व आपल दुकान उरकत उभे असलेले अज्ञात इसम काही न झाल्या सारखे आपल्याच धुंदीत मग्न होते.
समोरून येणारी एक व्यक्ती मला म्हणाली बाळ बर झाल उचललस. त्यावेळेस खुप राग आला जे त्या तिरंग्याचा जवळ उभे होते पण पाहुनही न पाहिलेल्या सारख केल त्यांचा शेवटी निघताना शब्दाने वार करत इतकच बोललो "आपल्याला तर १५आॅगस्ट आणि २६जानेवारीलाच जाग येणार" त्यावर सगळे हो हो करु लागले. त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी कळत नव्हतं. मी हातातील तिरंगा बॅगेतील लांबड्या वहित ठेवला व घरचा रस्ता गाठला.
परंतु डोक्यात विचारांचे कल्लोळ उठले होते एक एक नाव डोळ्यासमोर येत होती "भगतसिंग", "राजगुरू", "चंद्रशेखर आझाद", "सुभाष चंद्र बोस", "लो.टिळक", "सावरकर", "गांधी" "बाबु गेनू जे २०-२२ च्या वयात ज्यांनी आपल बलिदान दिले", एवढेच काय तर आता काल परवा शहीद झालेले "मे. राणे", २६/११ मधील "करकरे", "साळसकर", "मे. संदीप उन्नीकृष्णन", "तुकाराम" यांनी आणि यांसारखे अनेक जण ज्यांनी आपल्या प्राणांची देखील पर्वा नाही केली का तर माझा तिरंग्यावर दाग लागता कामा नये आणि दुसरीकडे मात्र आपण इतके व्यस्थ की त्याच तिरंग्याला पायदळी तुडवतोय.
#खंत
सुरज स म्हशेळकर